महापितामहाना दुःख देऊन शिवसेना सोडलेल्यांनी दुसऱ्यांना गद्दार म्हणणं किती योग्य आहे ?

काका कुडाळकर यांचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र
प्रतिनिधी । कुडाळ : संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांवर केलेली टीका ही उद्विग्न होऊन केलेली टीका आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार काका कुडाळकर म्हणतात, खरं म्हणजे अजित दादा पवार साहेब यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या वाटचालीत पक्षाच्या भरभराटीसाठी अहोरात्र मेहनत करून योगदान दिलेल आहे.अशा वेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्यावर संघटनात्मक जबाबदारी द्यावी आणि इतरांना हवं असं वाटणार विरोधी पक्षनेते त्यागण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती. तरीसुद्धा त्याची योग्य दखल माननीय शरदराव पवार साहेब यांनी घेतली नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अशावेळी सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी दादांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे त्यांनी या मागची वस्तुस्थिती सांगितली याचा अर्थ खालच्या पातळीवर टीका केली असा होत नाही.
खरं म्हणजे आमदार भास्कर जाधव यांना दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकारच नाही. ज्या पितामहांवर अजितदादा बोलले म्हणून त्यांना राग आला आहे . त्याच शरद पवार यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीचे तिकीट देवून भास्कर जाधव यांना आमदारकीची संधी दिली होती. भास्कर जाधव यांना पक्षात फार काळ काम न करताही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष केले होते. असं असतानाही जाधव साहेब तुम्ही 2019 मध्ये याच पितामहांना फक्त आणि फक्त शिवसेनेत गेल्यानंतर मंत्रीपद मिळेल या आशेने राष्ट्रवादी सोडून ऐनवेळी दगा दिला होता हा इतिहास आहे. त्याच पितमहांबद्दल आपल्याला कळवळा यावा म्हणजे हे फक्त आणि फक्त नक्राश्रू आहेत. त्यामुळे जाधव साहेब आपण किती आटापिटा केला तरी अजितदादा पवार साहेब यांच्या महाराष्ट्रातील ताकदीला आपण केसाएवढेही नुकसान करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याअगोदर आपण दोन दोन पितामहना दुःख दिलेल आहे हे विसरू नये, असे काका कुडाळकर यांनी म्हटले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.