प्रशासनाकडून व्यवस्था होईपर्यंत आ. वैभव नाईक यांनी स्वखर्चाने कोळंब वासियांना केला टँकरद्वारे पाणीपुरवठा

     कोळंब गावात पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली असून काल मालवण तहसीलदारांना आ. वैभव नाईक यांनी कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची व्यवस्था होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी आजपासून स्वखर्चाने तातडीने कोळंब वासियांना  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.  ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने पाणी टंचाई भागात पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर व कोळंब ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

    याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी,कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर,  ग्रा.प सदस्या  नंदा बावकर, संजना शेलटकर, संदिप शेलटकर आदिंसह कोळंब ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!