कलमठ मधील वीज समस्यांबाबत युवा सेनेची महावितरण कार्यालयावर धडक

पावसाळ्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करा

स्वतः लक्ष देऊन कार्यवाहीचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

कलमठ गावामध्ये गेले काही महिने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे सध्याचा गर्मीच्या वातावरण असून उष्माघात यासारखे प्रकार होत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे. तसेच काही गृह उद्योगांना देखील त्रास होत आहे. तरी तुम्ही लवकरात लवकर दखल घेऊन विद्युत समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी. तसेच पंधरा दिवसांवर येणारा पावसाळया अगोदर रस्त्या नजिक विजेच्या तारेला लागून असलेली झाडे साफ करणे, काही जुन्या तारा असतील तर त्या लवकरात लवकर बदलणे. जी काही पावसाळा यायच्या आधीची उपाय योजना आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी कलमठ युवा सेनेच्या वतीने वीज वितरण चे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच श्री किशोर लाड, कलमठ सुतारवाडी यांच्या आजूबाजूचा परिसरात नेहमी व्होल्टेज चा खूप प्रॉब्लेम आहे, व्होल्टेज सारखं कमी जास्त होत असते त्यामुळे विजेवर चालणारी बरीच उपकरणे खराब होतात. त्यावर आजच उपाय योजना करणे. कलमठ बाजारपेठ मध्ये असलेले श्री. दंताळ, श्री. मठकर, श्री. कुडतरकर,श्री. कडुलकर आणि श्री. नरे यांच्या घरी नेहमी विजेचा तुटवडा होतो ही घरे सोडून बाकी आजूबाजूचा ठिकाणी वीज असते. तर त्यांच्या घरी जाणारी विजेची लाईन बदलावी किंवा त्यावर उपाय योजना करावी.
अनाधिकृत कनेक्शन कट करणे. बाबत या अगोदरसुद्धा अनेक निवेदने देवून त्या निवेदनांकडे डोळेझाक केली गेली आहे. तरी आता या निवेदनाची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री,अनुप वारंग, सचिन खोचरे, निसार शेख (माजी सरपंच), राजू राठोड (युवासेना जिल्हा समन्वय), नितेश भोगले
सिकंदर मेस्त्री आदी उपस्थित होते. या संपूर्ण समस्या आणि प्रश्न स्वतः जातीनिशी लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. मोहिते यांनी शिष्टमंडळाला दिले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!