वायंगणी गावातील महिलांचा महिला विशेष ग्रामसभेवर बहिष्कार

जागतिक महिला दिन निमित्त शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वायंगणी मार्फत महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी घडलेल्या सौ. अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे गावातील महिलावर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत विशेष महिला ग्रामसभेवर बहिष्कार घालत सभेकडे पाठ फिरवली आहे.
या संदर्भात गावातील महिलांनी मालवण व आचरा पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन सदर प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून दुखंडे कुटुंबीयांना न्याय मिळावा अन्यथा महिलादिनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.





