कणकवलीतील धुंडाप्पा कट्टीमणी यांचे निधन

कणकवली टेंबवाडीत भाग्यवंती देवीचे मंदिर उभारणारे धुंडाप्पा भिमण्णा कट्टीमणी (वय ७३, मुळ आलमेल, जि. विजापूर) यांचे आज दु:खद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हात काम, व्यवसायासाठी रहाणारे विजापूर परिसरातील नागरिक त्यांना पुजारे या नावाने ओळखले जात होते.
सुमारे ६० वर्षांपूर्वी धुंडाप्पा हे वडील भिमण्णा यांच्यासोबत कणकवलीत आले. चिरे खाणीवर काम करण्यासह हमाली करीत असत. धुंड्डापा यांनी वीजेचा धक्का बसल्यानंतर त्यांनी हमाली सोडून हातगाडीवर कणकवली बाजारात खजूर विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी विजापूरवासिंयांच्या आर्थिक देणगीतून भाग्यवंती देवीचे पक्के मंदिर बांधले. दरवर्षी जत्रा भरवित असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे सिंद्धू, परशू, होमगार्ड मुलगी जयश्री, लक्ष्मी, मंजुळा, नातवंडे आदी परिवार आहे. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुळ गावी नेण्यात आला.

error: Content is protected !!