कणकवलीत काढण्यात येणारी 12 मे रोजी ची तिरंगा यात्रा स्थगित

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवलीत 12 मे रोजी काढण्यात येणारी तिरंगा यात्रा ही काही कारणास्तव स्थगित करण्यात आल्याची माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरता तिरंगा यात्रेचे आयोजन कणकवलीत करण्यात आले होते. पालकमंत्री नितेश राणे हे या यात्रेचे नेतृत्व करणार होते. मात्र भाजपा प्रदेश कार्यालयाकडून राज्यभरातल्या सर्व तिरंगा यात्रा स्थगित करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कणकवलीत काढण्यात येणारी ही तिरंगा यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

error: Content is protected !!