श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम


आचरा समुद्र किनारी केले गणेश विसर्जन वेळी निर्माल्य संकलन


आचरा–अर्जुन बापर्डेकर

डाँ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्या वतीने आयोजित गणेश विसर्जन वेळी आचरा समुद्र ककिनारी निर्माल्य संकलन कार्यक्रम करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला यावेळी श्री बैठक चिंदर येथील सदस्याचा आलौकीक असा उत्सुफुर्त प्रतिसाद लाभला. प्रतिष्ठानच्या सर्व श्री सदस्यानी निर्माल्य गोळा करुन त्यातील फुले व प्लॅस्टिक अलग केले .या गोळा केलेल्या निर्माल्य पासून खत निर्मिती केली जाणार असून ते खत डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने संपूर्ण राज्यभर लावण्यात आलेल्या झाडाना वापरले जाणार आहे .धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून स्वच्छता अभियान रक्तदान शालेय गरजू मुलांना गणवेश वह्या वाटप वृक्षलागवड व संवर्धन यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून या उपक्रमातून देखील सामाजिक बांधिलकी जपली जात आहे

error: Content is protected !!