
गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर मनोरूग्णावस्थेत सापडलेल्या दशरथ गोंधळी ह्या बांधवांचे जीवन आनंद संस्थेकडून कुटुंब पुनर्मिलन.
मानसिक स्थिती बिघडल्याने भरकटलेल्या बांधवांची दोन वर्षांनी झाली पत्नीसोबत भेट. जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बांधवाला केले कुटुंबियांच्या स्वाधीन. म्हापसा,दिनांक,25 मार्च:….तरूण मुलाच्या निधनाने मानसिक स्थिती बिघडल्याने दशरथ गोंधळी हे सावंतवाडीच्या एका गावातील बांधव त्यांच्या घर व कुटुंबापासून दोन वर्षांपूर्वी भरकटले होते.…










