तारकर्ली बंदर रस्ता प्रश्र्नी आमरण उपोषणाचा इशारा


मालवण : देवी केळबाई मंदिर ते तारकर्लीबंदर उर्वरित रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण,रस्ता दिनांक १५ मे पर्यंत न झाल्यास दिनांक १७/०५/२०२२ पासून आमरण उपोषण उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालय समोर करणार असे तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

    प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुका तारकर्ली हा गाव पर्यटनाचा बालेकिल्ला समजला जात असुन देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर प्रजीमा २८ क्रमांक २/०० ते ११ /७७० यातील काही रस्ता खडीकरण करून हॉट मिक्स व्हावा याकरिता पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करता करता काम चालू झाले. परंतु मुळात देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली देवबाग मागणी २०१६ पासून पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष गाठी भेटी वारोवांर होत असताना ,रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली असताना मागणी नुसार केला नाही तर अपुरा रस्ता डांबरीकरण कसा केला हे विचारणा केली तर अद्याप समाधान कारक उत्तर सा.बा.अधिकारीकडून  मिळत नाही.

     देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारित येत असल्याने उर्वरित देवी केळबाई ते वायरी हा रस्ता अर्धवट राहिलेला असून तो रस्ता अतिशय नित्कृष्ट, साईट पट्टी पूर्णतः गेलेली आहेत. तारेवरची कसरत करावी लागत असता अधून मधून अपघात होत आहेत गाड्यांचे टायर पंक्चर,गाड्या खराब होत असून नुकसान होत आहे तर काही गाड्या चालविण्यायोगे नसून अद्याप रस्ता  डांबरीकरण हॉट मिक्स का केला जात नाही.नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण,आत्मदहन करेपर्यंत वरिष्ठ अधिकारी वाट का बघतअसतात.लवकरात लवकरात रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करण्याकरीता त्याला कारण निधीचे होते.परंतु  कित्येक वेळा उपोषणे अवलंबले.खड्यात बसूनही उपोषणे केली तेव्हा तारकर्ली रस्त्याचे काम हाती घेतले तेही अपूर्ण आणि नित्कृष्ट झालेलं दिसतआहे.तरीही निधी मंजूर असतानाही कोणाची पाऊसाची वाट पाहून काम पाऊसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन खड्डे पडले असे सांगायचे आहेत.आणि पादचाऱ्यांना,वाहनांना भरपूर त्रास होत असल्याने काही दिवसात पर्यटन बंद होणार आणि पुढे पाऊस येणार मग काम करायचं काय. कोणतेही कारण अगर सबब कारण न सांगता दिनांक १५/ ०५/२०२३ पर्यंत काम चालू न केल्यास आणि काम चालू करायची कोणतीही लेखी आगाऊ सूचना न दिल्यास दिनांक १७/०५/२०२२ पासून मी आणि सोबत येणारे ग्रामस्थ आमरण उपोषणला मा. उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालय ,मालवण येथे बसणार याची आगाऊ सूचना देत आहोत.  
     रस्त्याचे काम अर्धवट केले गेले निधी मंजूर झाला असता सुर्वातच मधून कशी काय केली त्यावेळी विचारणा केली असता लगेचच यासोबत होणार परंतु नंतर पुढे रस्ता खराब असूनही अपूर्णच झाला .जर दिलेल्या तारीख ला काम चालू झाले नाही तर तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तारकर्ली तालुका / मालवण ब्युरो न्यूज
error: Content is protected !!