कामगीरीवर पाठवलेला शिक्षक जो पर्यंत शाळेत हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा तोंडवळी खालची शाळेच्या पालकाचा निर्णय

शाळेत कार्यरत शिक्षक कामगिरीवर पाठवल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची पुन्हा शाळेत नेमणूक होत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णय तोंडवळी खालची शाळेच्या पालकांनी एकत्र येत मंगळवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यावेळी जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, केतकी मायबाप, अनुष्का जुवाटकर, शमिका धुरी, मनस्वी तोडणेकर, गायत्री रेवंडकर, देवेंद्र मायबा, प्रिया तोरस्कर, गणपत शेलटकर, आनंद कोचरेकर नम्रता नंदकुमार कोचरेकर, गणेश रेवंडकर, नीलिमा रेवंडकर,अनिरुद्ध जुवाटकर पुंडलिक मालंडकर,संजय तारी, नंदकुमार कोचरेकर यांसह अन्य पालक आदी उपस्थित होते.
या बाबत माहिती देताना पालक नंदकुमार कोचरेकर यांनी सांगितले की शाळा पूर्ण प्राथमिक तोंडवळी खालची या शाळेची पटसंख्या २८असून तीन शिक्षकी शाळा असलेल्या या शाळेचा एक शिक्षक कामगिरीवर पाठवल्याने सध्या एक मुख्याध्यापक आणि सहशिक्षक मिळून दोन शिक्षक कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांच्या कडून एवढ्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी मुलांची व्यवस्थित शिकवणी होत नाही आहे.
याबाबत पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांची घेतलेल्या भेटीत फक्त दोन दिवसासाठीच सदर शिक्षक कामगिरीवर काढले असल्याचे सांगण्यात आलं होतं नंतर पुन्हा त्याच शाळेत कार्यरत होणारा असल्याचा पालकांना सांगण्यात आले होते मात्र बरेच दिवस होऊनही अजूनही सदर शिक्षक कामगिरीवरच असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे सदर शिक्षक शाळेत हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा इशारा तोंडवळी खालची शाळेच्या पालकांनी घेतला आहे.





