कणकवलीतील आजच्या मराठा समाजाच्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी

मनाई आदेश लागू असताना देखील कणकवली पोलिसांकडून मोर्चाला ग्रीन सिग्नल जालना येथे मराठा आरक्षण करता उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर पोलिसां कडून लाठीचार्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत आज सोमवारी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला…

Read Moreकणकवलीतील आजच्या मराठा समाजाच्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी

कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” चे प्रकाशन.”केवळ कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” मधु मंगेश कर्णिक.आचरा–अर्जुन बापर्डेकर”कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था कोकणातील उदयोन्मुख आणि प्रतिथयश साहित्यिकांसाठी स्थापन झाली. लिहित्या हातानी केलेली साहित्य निर्मिती वाचक रसिकांसाठी प्रकाशात आणावी आणि आधीच साहित्यसंपन्न असलेल्या कोकणातील नव्या साहित्य उन्मेषांमुळे या भूमीची सांस्कृतिक संपन्नता वर्धिष्णु व्हावी, हा परिषदेचा मूळ हेतू! श्री सुरेश ठाकूर. (अध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाच्या प्रकाशनातून साध्य केला आहे. हा अक्षर उपक्रम कौतुकास पात्र आहे. ”कोकणातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रात असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” असे गौरवोद्गार पद्मश्री तथा आद्य संस्थापक कोकण मराठी साहित्य परिषद – श्री.मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आभासी शुभेच्छा देताना काढले.या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे ‘दादासाहेब शिखरे’ सभागृहात शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. कोकण सुपुत्र ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक पूजनीय वि. स. खांडेकर यांच्या पुण्यतिथी दिवशी पुस्तक प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो (मालवणी कवी तथा केंद्रीय सदस्य कोमसाप) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनायक करंदीकर (कणकवली), रामचंद्र आंगणे (स्वीय सहाय्यक, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), रविंद्र वराडकर (ज्येष्ठ साहित्यिक), लक्ष्मीकांत खोबरेकर (कार्यवाह नाथ पै सेवांगण मालवण), अशोक कांबळी (अध्यक्ष जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), अनिकेत कोनकर (प्रकाशक सत्त्वश्री प्रकाशन) आणि सुरेश शामराव ठाकूर (संपादक बीज अंकुरे अंकुरे) हे होते.सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष कोमसाप मालवण ) यांनी सदर पुस्तक निर्मितीची कुळकथा सांगितली. कोमसाप मालवणच्या “पेरते व्हा” या नव्या लिहित्या हातांची ही अक्षर निर्मिती आहे, हे सांगितले.अध्यक्षपदावरून बोलताना श्री. रुजारीओ पिंटो म्हणाले, “पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोमसापच्या ६७ शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये ४० लिहित्या हातांना एकत्र करून दोन पुस्तके प्रकाशित करण्याची किमया मालवण शाखेने साध्य केली. ही गोष्ट निश्चितच लक्षवेधक आहे. ४० लिहित्या हातांकडून ४० नवीन पुस्तके नक्कीच प्रकाशित होतील.” कोमसापच्या कवींचाही एक काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, त्यात मलाही संधी मिळावी. आणि हे पुस्तक आपण केशवसुतांच्या चरणी अर्पण करावे अशी इच्छा त्यांनी प्रकट केली.यावेळी निमंत्रित वक्ते डॉ. विनायक करंदीकर यांनी ‘वि. स. खांडेकर यांचे जीवनचरित्र आणि कोमसापची वाटचाल’ याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना श्री आंगणे म्हणाले, “सोळा लेखकांची भाषाशैली, विषय व लेखन विविधांगी असल्याने चपखल अशा पद्धतीत लेखन झाले आहे. संपादक सुरेश ठाकूर यांनी आपल्या सोबत आपल्या सदस्यांनाही पुस्तक निर्मितीची जी संधी उपलब्ध करून दिली, ती खरच मार्गदर्शक अशीच आहे.”श्री खोबरेकर व श्री वराडकर यांनी कोमसाप मालवणच्या सर्व लेखकांचे कौतुक केले. तर पत्रकार श्री अनिकेत कोनकर यांनी लेखनातील तांत्रिक कौशल्यांबाबत उपस्थित सदस्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले.यावेळी पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर,करंदीकर,शिवराज विठ्ठल सावंत, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी या सोळा हातांनी ‘बीज अंकुरे अंकुरे ने’ आपणास काय दिले यावर आपले विचार मांडले.या पुस्तकाच्या ई – आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी श्री. रविंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचा शुभारंभ रश्मी आंगणे यांच्या शारदास्तवनाने करण्यात आला.ऋतुजा केळकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार दिव्या दीपक परब यांनी मानले. यावेळी कोमसापच्या अक्षर राखी बंधनाचा सोहळा संपन्न झाला. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी केले.सदर कार्यक्रमाला सुगंधा गुरव, राजेंद्र गोसावी, शर्वरी सावंत, अरुण भोगले, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, मंदार सांबारी , बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आणि कौटुंबिक सल्ला केंद्र सेवांगण यांचा परिवार तसेच अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.

Read Moreकोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” चे प्रकाशन.”केवळ कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” मधु मंगेश कर्णिक.आचरा–अर्जुन बापर्डेकर”कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था कोकणातील उदयोन्मुख आणि प्रतिथयश साहित्यिकांसाठी स्थापन झाली. लिहित्या हातानी केलेली साहित्य निर्मिती वाचक रसिकांसाठी प्रकाशात आणावी आणि आधीच साहित्यसंपन्न असलेल्या कोकणातील नव्या साहित्य उन्मेषांमुळे या भूमीची सांस्कृतिक संपन्नता वर्धिष्णु व्हावी, हा परिषदेचा मूळ हेतू! श्री सुरेश ठाकूर. (अध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाच्या प्रकाशनातून साध्य केला आहे. हा अक्षर उपक्रम कौतुकास पात्र आहे. ”कोकणातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रात असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” असे गौरवोद्गार पद्मश्री तथा आद्य संस्थापक कोकण मराठी साहित्य परिषद – श्री.मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आभासी शुभेच्छा देताना काढले.या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे ‘दादासाहेब शिखरे’ सभागृहात शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. कोकण सुपुत्र ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक पूजनीय वि. स. खांडेकर यांच्या पुण्यतिथी दिवशी पुस्तक प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो (मालवणी कवी तथा केंद्रीय सदस्य कोमसाप) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनायक करंदीकर (कणकवली), रामचंद्र आंगणे (स्वीय सहाय्यक, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), रविंद्र वराडकर (ज्येष्ठ साहित्यिक), लक्ष्मीकांत खोबरेकर (कार्यवाह नाथ पै सेवांगण मालवण), अशोक कांबळी (अध्यक्ष जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), अनिकेत कोनकर (प्रकाशक सत्त्वश्री प्रकाशन) आणि सुरेश शामराव ठाकूर (संपादक बीज अंकुरे अंकुरे) हे होते.सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष कोमसाप मालवण ) यांनी सदर पुस्तक निर्मितीची कुळकथा सांगितली. कोमसाप मालवणच्या “पेरते व्हा” या नव्या लिहित्या हातांची ही अक्षर निर्मिती आहे, हे सांगितले.अध्यक्षपदावरून बोलताना श्री. रुजारीओ पिंटो म्हणाले, “पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोमसापच्या ६७ शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये ४० लिहित्या हातांना एकत्र करून दोन पुस्तके प्रकाशित करण्याची किमया मालवण शाखेने साध्य केली. ही गोष्ट निश्चितच लक्षवेधक आहे. ४० लिहित्या हातांकडून ४० नवीन पुस्तके नक्कीच प्रकाशित होतील.” कोमसापच्या कवींचाही एक काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, त्यात मलाही संधी मिळावी. आणि हे पुस्तक आपण केशवसुतांच्या चरणी अर्पण करावे अशी इच्छा त्यांनी प्रकट केली.यावेळी निमंत्रित वक्ते डॉ. विनायक करंदीकर यांनी ‘वि. स. खांडेकर यांचे जीवनचरित्र आणि कोमसापची वाटचाल’ याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना श्री आंगणे म्हणाले, “सोळा लेखकांची भाषाशैली, विषय व लेखन विविधांगी असल्याने चपखल अशा पद्धतीत लेखन झाले आहे. संपादक सुरेश ठाकूर यांनी आपल्या सोबत आपल्या सदस्यांनाही पुस्तक निर्मितीची जी संधी उपलब्ध करून दिली, ती खरच मार्गदर्शक अशीच आहे.”श्री खोबरेकर व श्री वराडकर यांनी कोमसाप मालवणच्या सर्व लेखकांचे कौतुक केले. तर पत्रकार श्री अनिकेत कोनकर यांनी लेखनातील तांत्रिक कौशल्यांबाबत उपस्थित सदस्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले.यावेळी पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर,करंदीकर,शिवराज विठ्ठल सावंत, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी या सोळा हातांनी ‘बीज अंकुरे अंकुरे ने’ आपणास काय दिले यावर आपले विचार मांडले.या पुस्तकाच्या ई – आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी श्री. रविंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचा शुभारंभ रश्मी आंगणे यांच्या शारदास्तवनाने करण्यात आला.ऋतुजा केळकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार दिव्या दीपक परब यांनी मानले. यावेळी कोमसापच्या अक्षर राखी बंधनाचा सोहळा संपन्न झाला. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी केले.सदर कार्यक्रमाला सुगंधा गुरव, राजेंद्र गोसावी, शर्वरी सावंत, अरुण भोगले, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, मंदार सांबारी , बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आणि कौटुंबिक सल्ला केंद्र सेवांगण यांचा परिवार तसेच अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.

गणेश भक्तांची यंदाही कोकण रेल्वेला पसंती

लाखो भक्तगण येणार कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग मुंबई वरून सुटणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या 17, 18 ,19, 20 तारीख पर्यंत कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाउसफुल सावंतवाडी कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सव समजला जातो. अवघ्या कोकणवासी यांचा आवडतं म्हणजे गणेशउत्सव याला मुंबईकर एक दिवसासाठी…

Read Moreगणेश भक्तांची यंदाही कोकण रेल्वेला पसंती

भिरवंडे रामेश्वर मंदिरात वार्षिक लघुरूद्र

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन श्रीदेव रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे उद्या सोमवारी वार्षिक लघुरूद्र कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे. तसेच श्रावण सोमवार निमित्ताने दुपारी २ वाजता महीला-…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिरात वार्षिक लघुरूद्र

भडगाव नदीवरील पुलाचे लोकार्पण

*आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मालवण मतदार संघासाठी भरघोस निधी मंजूर करून असंख्य छोटी मोठी कामे पूर्णत्वास नेलेली आहेत. त्याचप्रमाणे भडगाव बुद्रुक येथील नदीवरील राज्य मार्ग…

Read Moreभडगाव नदीवरील पुलाचे लोकार्पण

उज्वला सावंत यांचे निधन

भिरवंडे-हनुमंतवाडी नं.1 मधील रहिवाशी सौ. उज्वला सूर्यकांत सावंत (77) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , तीन मुलगे, सूना, नातवंडे,पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सूर्यकांत सावंत यांच्या त्या पत्नी तर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कर्मचारी…

Read Moreउज्वला सावंत यांचे निधन

तळवडे गावातील बँक ऑफ इंडिया चे ए टी एम अनेक दिवस बंद

गणपती उत्सवात ग्राहकांची होणार मोठ्या प्रमाणात अडचण चोरट्याने एटीएम फोडल्यापासून बँक ऑफ इंडियाने एटीएम ठेवले बंदच सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावं हे विकासाचे प्रतीक मानले जाते .मोठया प्रमाणात बाजारपेठ विस्थार होत असुन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या असे हे गाव आहे .…

Read Moreतळवडे गावातील बँक ऑफ इंडिया चे ए टी एम अनेक दिवस बंद

कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

विविध संघटना आणि ग्रामस्थ महावितरण समोर छेडणार उपोषण प्रतिनिधी । कुडाळ : महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे केरवडे ग्रामस्थ, पिंगुळी-शेटकरवाडी-गुढीपुर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाज यांच्या…

Read Moreकंत्राटी कर्मचारी धनंजय फाले मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – अतुल बंगे

गव्या रेड्यांपांसुन भात शेतीचे संरक्षण करा – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी…

Read Moreजिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – अतुल बंगे

थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – सुनील पवार

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप प्रतिनिधी । कुडाळ : स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर आपण त्या त्या क्षेत्रात पावले टाकली पाहिजेत. थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात वावरले पाहिजे असे…

Read Moreथोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – सुनील पवार

सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर

सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचारी सह पतसंस्था मर्या., सिंधुदुर्गची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिनिधी । कुडाळ : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सह पतसंस्थेचे खेळते भांडवल सध्या ३ कोटीच्या वर आहे. सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेले कॅश क्रेडीट कर्ज संस्थेने अल्पावधीतच निरंक केले आहे.…

Read Moreसर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर

तेंडोली विविध क्षेत्रात आघाडीवर – बापू नाईक

श्री देव रवळनाथ मंदिरात आरती आणि नामस्मरण सप्ताह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली गावाला धार्मिक व निसर्गतेचा वारसा लाभला आहे. हा गाव कला क्रीडा कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक यांनी केले. तेंडोली…

Read Moreतेंडोली विविध क्षेत्रात आघाडीवर – बापू नाईक
error: Content is protected !!