कुडाळ एमआयडीसीतील कंपन्यांची प्रदूषण नियोजन यंत्रणा तपासा !

प्रकल्प शेतकऱ्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडे लेखी मागणी
कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील काही कंपन्यांची प्रदूषण नियोजन यंत्रणा योग्य प्रकारे नसल्याने त्याची तपासणी करा, असे मागणीपत्र नेरूर गणेशवाडी येथील प्रकल्प शेतकरी सिद्धेश प्रभाकर देसाई यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे केले आहे.
कुडाळ एमआयडीसीतील काही कंपन्यांची प्रदूषण नियोजन यंत्रणा योग्य नसल्याने त्याचा परिणाम एमआयडीसी जवळील नेरूर-गणेशवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि अन्य नागरिकांना होत आहे. यामध्ये प्रामुख्याने घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, खोकला हे आजार या परिसरात वाढत आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांची तपासणी करून चुकीचे नियोजन असल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत आज सिद्धेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गावडे, सचिन गावडे, भूषण परब, अजित मार्गी यांनी लेखी निवेदन कुडाळ एमआयडीसी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ
प्रतिनिधी, कुडाळ