कणकवली मुंबई दोन बस फेऱ्या वाढविण्यासाठी निवेदन

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांची मागणी

सध्या उन्हाळी व शालेय सुट्ट्या सुरू झाल्यामुळे कोकणातून मुंबईत आणि मुंबईतून कोकणात येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला आहे हे लक्षात घेऊन कणकवली वरून मुंबईला जाणारी व मुंबईवरून कणकवली ला येणारे दोन जादा बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेना कणकवली शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर आणि उपशहर प्रमुख वैभव मालंडकर यांनी केली आहे.

कणकवली एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करून प्रमोद शेठ मसुरकर, वैभव मालंडकर यांनी ही मागणी केली आहे.
कोकणातून मुंबईकडे आणि मुंबईतून कोकणाकडे येणाऱ्या नियमित दोन जादा बस फेऱ्या सुरू कराव्यात त्यातील एक सकाळी कणकवली ते मुंबई अशी फेरी व दुसरी संध्याकाळी रात्र आणि सेवा सुरू करावी असे या निवेदनात म्हटले आहे.

सितराज परब । कणकवली

error: Content is protected !!