दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.

एम.पी. एस.सी.,व यु.पी.एस.सी.ला विचारले जाणारे बहुसंख्य प्रश्न हे कलाशाखेशी जास्त निगडीत असल्याने त्यांच्या पदवी पर्यंतचा पाया मजबूत नसल्यानेच मुलांच्या पदरी निराशा येते.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या करिअर गायडंस या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी…







