तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे…

*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

*मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*

-जिल्हाधिकारी किशोर तावडे


            सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे,  आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत  महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी ,मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार  नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा असेही ते म्हणाले.

          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, सूक्ष्म नियोजन करुन परिस्थिती हाताळावी असेही ते म्हणाले.

          बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प माहिती, मान्सून कालावधीतील मुख्य धोके, पूर येण्याची कारणे, दरड कोसळण्याची कारणे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शोध व बचाव करिता घेण्यात आलेल्या साहित्याची सद्यस्थिती आदींची माहिती दिली.

००० ०००

संदेश पारकर यांच्या सासूचे निधन

कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी सुहासिनी भालचंद्र कोदे (८६) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या वागदे येथील रत्नागर हॉटेलचे मालक अनंत उर्फ बाळू कोदे यांच्या मातोश्री तर उबाठा…

राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध कणकवली प्रतिनिधी

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.…

खारेपाटण काझीवाडीत पोलिसांनी घेतली मोहल्ला कमिटी बैठक

तणावग्रस्त वातावरण टाळण्यासाठी स्थानिकांशी केला विचारविनिमय खारेपाटण या गावी एप्रिल २०२४ या महीन्यामध्ये जमीन जागेच्या कारणावरुन परस्पर विरोधी एकुण सहा गुन्हे कणकवली पोलीस ठाणे येथे दाखल झाले होते.त्यामुळे गावामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.तसेच सध्याची लोकसभा निवडणूकीची पार्श्वभूमी लक्षात घेता.गावामध्ये…

घोडावत विद्यापीठात व्हॉइस कल्चर कार्यशाळा

अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठातील स्कूल ऑफ मीडियाच्या वतीने एक दिवसीय व्हॉइस कल्चर (आवाज जोपासना) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रोफेशनल व्हॉइस ट्रेेनर तुषार भद्रे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार 9 मे रोजी घोडावत विद्यापीठात कार्यशाळा होईल अशी माहिती विभागाचे…

कणकवली तालुक्यातील शेर्पे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

निवडणूक वादातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर याद राखा जशास तसे उत्तर देऊ, सुशांत नाईक! लोकसभा सार्वत्रिक निवडणूक साठी मतदान संपल्यावर सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यात भाजपा व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत ठाकरे…

चिंचवली येथील ८० वय असणाऱ्या जनार्दन धोंडू पेडणेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. कडाक्याचे ऊन असूनही नागरिकानी उत्साहाने मतदान केले. चिंचवली येथील ८० वय असणाऱ्या जनार्दन धोंडू पेडणेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा प्राथमिक शाळा चिंचवली मधली वाडी मतदान केंद्र क्रमांक २०१ या मतदान…

error: Content is protected !!